श्री शिव-शाहू महाविद्यालय, सरूड
मराठी विभाग आयोजित
रानकवी ना. धो. महानोर यांना आदरांजली व रानातल्या कवितांचे वाचन
सोमवार दिनांक ०७ ऑगस्ट २०२३
श्री शिव-शाहू महाविद्यालय, सरूड मराठी विभाग आयोजित रानकवी ना. धो. महानोर यांना आदरांजली वहण्याच्या निमित्ताने 'रानातल्या कविता' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मराठी साहित्यातील प्रसिद्ध ग्रामीण रानकवी ना. धो. महानोर यांचे गुरुवार दिनांक ०३ ऑगस्ट २०२३ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले.
मराठी ग्रामीण साहित्यात ना. धो. महानोर यांच्या कवितांचा प्रभाव उल्लेखनीय आहे. याशिवाय शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात बी. ए. II मध्ये अभ्यासपत्रिका क्रमांक IV साठी ना. धो. महानोर यांच्या 'पक्षांचे लक्ष थवे'' यामधील निवडक गीतात्मक कवितांचा समावेश अभ्यासक्रमात केलेला आहे. या अनुषंगाने विद्यार्थ्यांना त्यांच्या कवितेची अभिरुची विकसित व्हावी व 'रानातल्या कविता' या कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यांना आदरांजली व त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करावे या उद्देशाने सकाळी १०.४५ ते दुपारी २.३० या वेळेत कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी 'रानातल्या कविता' या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे यांच्या हस्ते ना. धो. महानोर यांच्या पुस्तकांना हार व पुष्प अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. रघुनाथ मुडळे यांनी केले. प्रास्ताविकाच्या अनुषंगाने ना. धो. महानोर यांच्या कविते संदर्भातील सद्य परिस्थिती स्पष्ट करून ना. धो. महानोर यांच्या स्मृतींना अभिवादन करणे हे मराठी विभागाचे कर्तव्य आहे. त्या दृष्टीने आपण सर्वजण जमलात असे वक्तव्य करून या निमित्ताने शब्दसुमनांनी स्वागत केले. प्रास्ताविकेनंतर बहुउद्देशीय सभागृहातील विचारपीठ व विद्यार्थ्यांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून महानोर यांच्या प्रति शोकात्मक स्वरूपात आदरांजली वाहण्यात आली.
यानंतर कवीवर्य ना. धो. महानोर यांच्या कवितांचे काव्यवाचन विद्यार्थ्यांनी केले. यामध्ये कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील साधारण २५० विद्यार्थी उपस्थित होते. यामध्ये महाविद्यालयातील कु. प्रतीक्षा रमेश घोलप हिने 'आम्ही ठाकर ठाकर ठाकर', कु. सानिका दीपक पाटील 'भरलं आभाळ', मयुरी दिलीप पाटील 'झिम पोरी झिम..', सानिका संजय पवार 'पाणी पाणी पाणी…', रसिका सुतार 'आईचा जन्म', ईश्वरी पाटील 'चिंब पावसानं..', गणेश चव्हाण 'मी अमृताचे कुंभ प्यालो..', आम्रपाली घोलप 'शेतकऱ्याचं गाणं..', साक्षी बाबाराम हरगुडे 'मी असा एक कल्ली…' अशा अनेक कविता वाचनांनी सभागृहातील रसिकांची वाहवा मिळवली.
यानंतर कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील प्रा. के. एन. पाटील, डॉ. के. ए. पाटील यांनी महानोर यांचा जीवनपट उलगडून सांगितला. शिवाय त्यांच्या कवितांचे काव्य वाचन केले. प्रमुख मनोगत प्रा. सौ. एस. एन. खरात यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी मराठी काव्याची पार्श्वभूमी सांगून विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट व बहिणाबाई चौधरी या परंपरेशी महानोर यांच्या कवितेचा गेयतेच्या अनुषंगाने आलेला सहसंबंध स्पष्ट केला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. पी. बी. पाटील यांनी आपल्या मनोगतांमध्ये निव्वळ कविता वाचून मोकळे होण्यापेक्षा कवितेचा अर्थ आशय व तपशिलासह कविता अनुभवण्याचा प्रयत्न करा व भाषिक विचारांची प्रगल्भता जपा असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ना. धो. महानोर यांची 'या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि मातीतून चैतन्य गावे' या कवितेचे काव्य वाचन केले. वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. एल. टी. आरगे यांनी महानोर यांच्या कवितेचे गायन केले.
अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे यांनी 'कविता आणि मानवी जीवन यातील परस्पर संबंध स्पष्ट करून कवितेचा आस्वाद विज्ञान शाखेच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनीही वेळोवेळी करून घ्यावा असे आवाहन करून महाविद्यालयात राबविला जाणारा 'कवितेचा कट्टा' यासारखे उपक्रम कवी घडवण्यास नेहमीच मार्गदर्शक ठरतील.' असे प्रतिपादन केले. याशिवाय उपस्थित कवी प्रेमी यांना महानोर यांच्या निवडक मराठी चित्रपटातील गीतांचे पडद्यावर सादरीकरण करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रा. डॉ. नवनाथ गायकवाड, प्रा. राज गायकवाड, प्रा. आनंदा पाटील, प्राध्यापिका ज्योती हरगुडे, प्रा. डॉ. ए. ए. अत्तार, प्रा. डॉ. एस. एस. बनसोडे, प्रा. डॉ. पी. टी. वाघमारे, प्रा. दत्तात्रेय नलगे, प्रा. पी. ए. चरणकर, प्रा. प्रवीण कांबळे, प्रा. एस. बी. शिनगारे, प्रा. सुनील घोलप, प्राध्यापिका ऐश्वर्या पाटील, प्राध्यापिका प्रतिभा पाटील, प्राध्यापिका वासंती जाधव, प्राध्यापिका सोनाली पाटील, प्राध्यापिका उज्वला पाटील, प्राध्यापिका पूनम सावंत, प्राध्यापिका शाहीन शेखसुतार, प्राध्यापिका मेघा राणी पाटील इत्यादी प्राध्यापक उपस्थित होते.
विज्ञान विभागातील प्राध्यापिका ऐश्वर्या पाटील यांनी काव्य गायन केले. प्रा. प्रकाश नाईक यांनी महानोर यांच्या चित्रपट गीतांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रा. डॉ. एल. के. बोराटे यांनी 'घन ओथंबून येती' या कवितेचे गायन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रकाश नाईक यांनी केले. आभार प्रा. डॉ. एल. के. बोराटे यांनी मानले.